Wednesday, December 18, 2013

मोकळ्या हवेला धुक्याची मिठी

हे असले काव्य तुम्ही बहुतेक ऐकले नसेल. आणि न ऐकलेलेच बरे, असे मला वाटते, कारण मी ते live ऐकून खो खो (रडले ) हसले आहे. तुम्हाला हे असे हसायचे असेल तर मात्र तुम्ही ते नक्कीच मिस केले ..

बर्याच जणांना आपण कवी आहोत किंवा कवयित्री आहोत हे कळल्यावर हरखून जायला होते. म्हणजे मी नवीन उदयाला आलेल्यान्बद्दल बोलत आहे. आणि त्यात तर जबरदस्तीचा audience मिळाला प्रत्यक्ष काव्य ऐकायला तर मग सांगायला च नको.  काही वेळा मोठ्या status च्या अशा  संमेलनात मग थोडे असेही काही ऐकून घ्यावे लागते..तोंड दाबून बुक्यांचा मार..

तर गोष्ट अशी आहे कि एक सुदृढ बाई ह्या संमेलनात कवयित्री म्हणून आल्या. आणि स्वतःवरच खुश होऊन त्यांनी आपली कविता वाचायला घेतली..आम्ही तेंव्हा होबार्ट मध्ये होतो..असे म्हणत तिने बरीच मोठी प्रस्तावनेची बारात प्रेक्षकांवर केली. तिथेच माझी हसून हसून आधी मुरकुंडी वळली होती कारण होबार्ट मधून बाहेर येईन ही बया आता मूळ मुद्द्यावर कधी येणार ह्या कल्पनेने मला रडू न आणण्याचे मीच ठरवले होते..

आणि शेवटी चालू झाली तिची धुक्याची मिठी..आणि नुसती चालूच नाही तर तिने त्याला चाल ही लावलेली असल्याने तिने गाणेच म्हणायला सुरु केले मोकळ्या हवेचे..ते ऐकून आम्ही ठार  वेडे होत आलेलो कारण ती चाल पूर्णपणे चोरलेली होती (आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल). आणि तिचे गाणे पण तेवढेच stage वर भयानक वाटत होते ऐकायला..

त्यानंतरचे lyrics पण हळूहळू पुढे आले..धुंद भावनेला धुक्याची मिठी..आणि पुन्हा एकदा तेच पारायण.एकदा तर वाटले की हे सगळे धुके आता अख्या सभागृहात पसरते  की काय...

तर थोडक्यात अत्यंत हसतमुखाने आम्ही हा कार्यक्रम  बघितला आणि अर्थात हसू लपवत लपवत हे सांगायला नकोच...

Sunday, December 8, 2013

कभी तनहाइयो मेन यु

तनहाई उर्फ एकटे पणा, हा तसा कित्यक हिंदी गाण्यांचा आवडता शब्द आहे. बर्याचदा तो नकारात्मक रित्या वापरला जातो..मग ती आमीर खान ची मिलो फैली हुई तन्हाई असो आणि सोनू मिगम ने त्या सर्व मिलो ना दिलेला एक सच्चा आवाज असो, वा उर्मिला चे तनहा तनहा असो आणि आशा  भोसले नि त्यात जीव  तोडून ओतलेली तनहाई असो..ही तनहाई नेहेमीच दिसत आलेली आहे. आणि ती असते ही. कधी अर्थहीन कधी अर्थपूर्ण..आणि बर्याचदा अर्थातच movies मध्ये हा शब्द ताटातूट आणि ओढ  इत्यादींशी जोडलेला असतो.

अजून एक तनहाई असते..शांत, निस्तब्ध, ज्यात आपण तेवढेच शांत आणि निस्तब्ध असतो. त्यात फारशी भावनांची चढाओढ नसते. ती तनहाई थोडी शहाणी असते. अर्थात शहाणेच असले पाहिजे असेही नसते आणि वेडी तनहाई पण तेवढीच महत्वाची असते पण ही जी शहाणी तनहाई असते ती आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून देते. आसमंतात जी नितांत शांतता भरून राहिली आहे तिच्याशी आपल्याला connect करून देते.