Tuesday, July 30, 2013

कैसे केहे दु गम से घबराता नही..

एकतीस जुलै हा दिवस लहानपणापासून कित्येक वर्ष आठवणीतला राहिला..आता फ़क़्त आठवते ते त्या दिवसाचे आठवणीत राहणे.  प्रसिद्ध गायक मुहम्मद रफी ह्याची पुण्यतिथी आणि त्यानिम्मित्त आम्ही कित्येक वर्षे बघितलेला moods of rafi  हा कार्यक्रम. आमचे व्ही जे टी आई मधलेच प्रोफेसर अशोक खरे हे रफी सारखेच थोडे दिसतात, आवाज रफी सारखाच आणि त्याच style ने गाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपला आवडत्या कलाकाराला श्रद्धांजली म्हणून..

कधी कधी वाटते fan-following चा पण एक काळ असतो..एक त्या त्या वेळेची धमाल असते. रफी चा आवाज हा एक वेगळाच freshness घेऊन हिंदी चित्रपटांमध्ये आला आणि आपलाच होऊन गेला. आता त्याला मिळालेली गाणी किती दर्जेदार होती किती नव्हती का प्रश्न वेगळा. He had his own share of good bucks and back bucks. पण शम्मी कपूर, आशा भोसले, ओ पी नय्यर अशा काही काहींबरोबर त्याच्या special जोड्या होत्या ज्या एकदम प्रसिद्ध झाल्या आणि लोकांनाही त्याचा  entertainment share देऊन गेला. आमच्या घरी मुहम्मद रफी चे सगळे fan होत गेले आणि खरेंचा कार्यक्रम वर्षातून एकदा रफीला खास दाद द्यायला छान वाटायचा.

पण मग  fan-following हे आपल्या कक्षा विस्तारत जातात तसे बदलत जाते, नवीन कलाकार दिसतात किंवा कलाकृती आवडते किंवा एखादे वेगळेच world music आवडून आपण त्याच्या प्रेमात पडतो, एखादी वेगळीच irish tune आवडत जाते, थोडक्यात आपण आपले आवडी निवडींचे spectrum वाढवतो किंवा re-invent ही करतो. Explore and you will find becomes our new matra and all that.

आणि मग असाच एखादा एकतीस जुलै येतो आणि वाटते रफी साहब रफी साहब थे, अपनी जगाह पे कायम थे.

आपल्याला ज्या ज्या कलाकारांनी, musical कलाकृतींनी आनंद दिला आहे, मग ते  'आनंदी' गाणे असो, वा 'दर्दभरे' , ते सर्वच 'खरे'.

ह्या वेळी तो जोश नाही, एकतीस जुलै चा कार्यक्रम ऐकायचाच असा अट्टाहास नाही..पण तरीही आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल वाटणारे प्रेम कायम आहे.

Monday, July 1, 2013

सरहदें इंसानो के लिये है..

बोर्डर ..सीमा..खरोखरच माणसांनीच माणसांसाठी केलेल्या आहेत का? सोनू निगम ने म्हटलेल्या ह्या एका intense गाण्याचे बोल खरोखरच छान आहेत. ह्या सीमा मग खरे तर देशातल्या असतोत, राज्यांमधल्या असोत, माणसांमधल्या असोत..पक्षी, वारा ह्या सर्व निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगणार्यांना थोडीच सीमांची पर्वा  असते? आणि आपण माणसे सीमान्मध्येच गुरफटून राहतो, बनवतो त्यांना, त्यावरून तुझे माझे करतो, भांडतो ही ..निसर्गाने जसे आपल्याला नेमून देले आहे तसे कमी वागतो..

मी आतापर्यंत असंख्य सीमा बघितल्या आहेत..देशा देशातल्या, राज्य राज्यातल्या ..प्रत्येक बोर्डर ला एक तिचे वेगळे सौंदर्य..आणि गम्मत म्हणजे आपल्या डोक्यात ही बोर्डर कशी असेल ह्याबद्दल काहीच्या काही कल्पना असतात, पण प्रत्यक्षात बोर्डर म्हणजे एक same continuous जमीन दिसते. लोक पण असे काही एकदम वेगळे दिसतात नाहीत त्या बोर्डर वर तरी..बरेचसे बदल हळूहळू दिसतात, मग ती बोली भाषा असो, लिहिण्याची लिपी असो, नाणी असोत, इतर units of measure असोत, खाण्या पिण्याच्या सवई असोत..किंवा belief systems असोत वा पेहेराव असो. आणि गम्मत म्हणजे कित्येक वेळा बोर्डर वरती वेगळच गाव वसते जे दोन्ही कडचे असते किंवा दोन्हीकडचे नसते..

ह्या सगळ्याचे च मला खूप अप्रूप वाटते, विमानातून जाताना तर ह्या सर्वच सीमा कितीतरी धूसर होत जातात..आणि कुठलेच बदल असे दिसत नाहीत ..दिसते ते एक मोठी continuous जमीन किंवा पाणी किंवा मोठाच्या मोठा ढग maybe..हे सगळे बघता बघता आणि अनुभवता अनुभवता आपण वार्यासार्खेच काही काळ तरी होतो..कुठल्याच सीमा matter करत नाहीत..आपण बोर्डर स्वतः बरोबर घेऊन जातो..आणि ती मग एक changing constant  बनून जाते जिला आपण हवे तसे आकारू शकतो..at least मनातल्या मनात तरी..अर्थात हे सर्व झाले काल्पनिक आणि आदर्श. प्रत्यक्षात अगदी आजच्या global citizen च्या जमान्यात सुद्धा आपण बर्याच बोर्डर्स जगतो, कदाचित जास्तच. अगदी living on the edge म्हणतात न तसेच. मी पूर्ण भारतीय नाही पण पूर्ण western ही नाही, मी मुंबईकर नाही पण पुणेकर पूर्ण नाही कारण मी एक global citizen आहे आणि पुणेकरी पाट्यांच्या चौकटीत मी बसत नाही. तो इंग्लंड चा अगदी country-sider नाही पण त्याला london ची मेट्रो लाईन चालू झाली की धसका बसतो..

मी  भारत की आखरी चाय की दुकान नावाचे interesting दुकान बोर्डर वर बघितले आहे पण त्याच दुकानामागे अजून १ इंच जाऊन पण कोणीही अजून एक भारत कि खरी खुरी आखरी चाय की दुकान काढू शकतोच की. पण तरीही हा बोर्डर बद्दल चा मामला चालूच राहणार..माणसाला थोडेच पूर्णपणे कळणार आहे कि ह्या सर्व सीमारेषा का व्यर्थ आहेत?