Wednesday, March 12, 2025

काटकसर हवीच पण कंजूषपणा नको

माझ्या शाळेत आल्याआल्या विंग मध्ये खूप छान छान सुविचार लिहिलेले असत. अगदी शाळेतल्या वर्गात सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला रोज एक नवीन छान विचार उर्फ सुविचार लिहायला सांगितला जात असे. तेंव्हापासूनच हा रोज एक सुविचार मनावर लिहिला जात असे, खडूने. हे सगळे इतके ऑरगॅनिक होते, की अजूनही मी quotes च्या शोधात असते.. 

"काटकसर हवीच पण कंजूषपणा नको". हा एक त्यातलाच एक कोट.  घरीही ह्या कोट ला साजेसेच वातावरण होते. म्हणजे अगदी त्यातल्या त्यात काटकसरीकडे झुकणारे जास्तच. काटकसर होतीच, पैसे ही फारसे नव्हते, होते ते व्यवस्थित खर्च व्हायचे, वाचवत वाचवत, सगळेच जुळून यायचे. त्यात आम्ही ही आहे त्यात खुश होतो. साधी राहाणी हे मूळ तत्व उर्फ value foundation होते. मग काटकसरीची सुरवातच भाजी बाजारापासून व्हायची. आई किंवा बाबा भाजी माफक दरात मिळेल तिथून आणायचे मग त्या साठी थोडे जास्तीचे कष्ट घेतले तरी चालतील. किंवा खरं तर कष्ट हाच धर्म होता. तो आम्ही बघितला अनुभवला आणि कधी question करावासा वाटला नाही. शाळेतली, मित्र मैत्रिणींची, नातेवाइकांबरोबरची  सेलेब्रेशन्स देखील तशी साधीच असायची हो त्यातही काटकसर ला मूलभूत घटक किंवा अगदी आयुष्याचा 'महत्तम सामायिक घटक' उर्फ मसावि होता म्हंटलं तरी हरकत नाही. 

उन्हाळा  सुरु झाला कि शाळेत अगदी ह्या quote ला साजेसे सेलेब्रेशन व्हायचे. कैरीची डाळ, पन्हे आणि कलिंगड  'क प क' सेलेब्रेशन म्हंटले तरी चालेल. अगदी आजच्या काळातल्या A B C  ज्यूस सारखे. :)

मग पुन्हा एकदा त्या काळात डुबकी मारून हे बघावे म्हंटले तर वाटते की फक्त काटकसर च होती का? का कंजूषपणा देखील होता? तर नाही. घरी सगळे गोड  धोड पदार्थ बनायचे, विकत आणायचो.  कपड्यांची थोडी फार चैन होती,  प्रवासाची आवड असल्याने रिकरिंग अकाउंट चालू करून आई बाबा पैसे वाचवायचे आणि आम्ही जमेल तसे फिरतही असू . इन फॅक्ट मला प्रवासवर्णन लिहायची किंवा काहीतरी लिहायची आवड ह्या च काळात निर्माण झाली. म्हणलं तर सुट्टीत पिक्चर बघणे, नाटक बघणे गाण्याचे प्रोग्रॅम्स बघणे जास्त करून मूड्स ऑफ रफी हा, किंवा अगदी मराठीतला गीत रामायण देखील. कधी पुढचा रो कधी थोडा मागचा किती खर्च करायचा त्यावरून विचार केला जात ही असेल. पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वानंद शोधायला स्वातंत्य्र देखील मिळत असे. :) 

कधी वाटतं स्वानंदाची काही किंमत असते का? फार नसेल किंवा बिलियन डॉलर च्या ही पलीकडे असेल? एखादा फकीर आनंदी असतो तशी?  तर काहीही असो , आपण तो आपण मिळवला पाहिजे, आपल्या जवळच्यांना वाटला ही पाहिजे..खर तर..तेच होत ही असे! आनंद द्विगुणित किंवा त्रिगुणित होणे हे सगळे ह्यातून विनासायास घडत असे. 

आनंदाचा भागाकार होण्याची करणे देखील फारशी नव्हती. सो निखळ आनंद जास्त वाटत असे आणि तो पैशाने विकत घेता येत ही नसे :) 

म्हणजे पैसे महत्वाचे नाहीत का? होते तर. पण आहे ते थोडे फार  काटकसरीने राहून, पण कंजूषपणे न राहता जमून जात असे. 

ह्या सगळ्या ला आता अनेक पर्व  उलटली. अजूनही काही गोष्टी मूल्ये तशीच आहेत. बघितलं  तर आता काळाच्या ओघात पैसे ही आले, राहणीमान आले, luxuries आल्या. गाड्या आल्या , घोडे आले (ते नाही आले पण आपला असच लिहिला :)). गॅजेट्स आली. प्रवास आले. अजूनही चालू. सगळं सगळं च quantitatively वाढत गेलं , सुधारलं. काटकसर कमी झाली. कंजूषपणा नव्हताच पण कुठेतरी सगळ्या  मुल्यांचा मेळ जमेनासा झाला . म्हणजे वास्तविक पाहता मूल्ये तीच राहिल्येत. पण त्यांची आजच्या काळातली आकडेमोड थोडी गडबडली. आज खूप जणांकडे लॅव्हिश घरे आहेत, बऱ्याचशा मटेरिअलिस्टिक गोष्टी ही आहेत. काटकसर नावाचे ते नाटकातले पात्र कुठेतरी माळ्यावर निघून गेल्यासारखे वाटते. वारेमाप पैसे मोजले जातात एखाद्या इन्स्टंट आनंदा साठी, एखाद्या मोठ्या इव्हेंट साठी, किंवा असेच काहीतरी. हे सगळे आजूबाजूला चाललेले दिसते .. पण मला वाटतं हे सगळे transformation किंवा परिवर्तन आपण रोखू शकत नाही आणि रोखू ही नये. पण त्यावर घोड्यावर आरूढ होतो तसे आरूढ व्हावे. 

म्हणजे काय,..? तर कदाचित त्याच values आहेत..  एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीतील खर्चाचा आवाका बघावा देखील पण बिनधास्त मग खर्च ही करावा. वस्तू मधून आनंद मिळत नसला तरी हेही अर्धसत्य आहे. आजच्या काळात लागणाऱ्या काही गोष्टींवर काळाची गरज म्हणून नक्कीच खर्च केला पाहिजे.  वोह जिंदगी ही क्या जिस में हम पैसे सिर्फ एक बक्से में राखे? या दिल कि सुनो दुनियावलो? दिल की आवाज भी सुन? .. काटकसर हवीच पण इतकीही नको की आपण पैसे असूनही ते खर्च कसे कशावर करावेत हेही विसरून जाऊ. म्हणतात ना penny wise pound foolish बानू.  किंवा पैसे असूनही अकबर  बादशाह सारखे वागूनही काय मजा त्यात? बूंद से गइ वोह फीर हौद से नही आती ? 

सगळ्यांनाच अकबरासारखा बिरबल भेटत नाही.. आपल्यालाच आपलेच बिरबल व्हावे लागेल. एक बिनधास्त दिलदार आयुष्य जगायला .. आणि तेही अगदी 'बुंदे' वालं नाही.. 'हौद' वालं ही नाही.. कुठेतरी त्यांच्या सीमा रेषेवर? व्हॉट से ?

No comments:

Post a Comment