Showing posts with label एकटेपणा. Show all posts
Showing posts with label एकटेपणा. Show all posts

Sunday, December 8, 2013

कभी तनहाइयो मेन यु

तनहाई उर्फ एकटे पणा, हा तसा कित्यक हिंदी गाण्यांचा आवडता शब्द आहे. बर्याचदा तो नकारात्मक रित्या वापरला जातो..मग ती आमीर खान ची मिलो फैली हुई तन्हाई असो आणि सोनू मिगम ने त्या सर्व मिलो ना दिलेला एक सच्चा आवाज असो, वा उर्मिला चे तनहा तनहा असो आणि आशा  भोसले नि त्यात जीव  तोडून ओतलेली तनहाई असो..ही तनहाई नेहेमीच दिसत आलेली आहे. आणि ती असते ही. कधी अर्थहीन कधी अर्थपूर्ण..आणि बर्याचदा अर्थातच movies मध्ये हा शब्द ताटातूट आणि ओढ  इत्यादींशी जोडलेला असतो.

अजून एक तनहाई असते..शांत, निस्तब्ध, ज्यात आपण तेवढेच शांत आणि निस्तब्ध असतो. त्यात फारशी भावनांची चढाओढ नसते. ती तनहाई थोडी शहाणी असते. अर्थात शहाणेच असले पाहिजे असेही नसते आणि वेडी तनहाई पण तेवढीच महत्वाची असते पण ही जी शहाणी तनहाई असते ती आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून देते. आसमंतात जी नितांत शांतता भरून राहिली आहे तिच्याशी आपल्याला connect करून देते.